प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. मृणालीराजे सुशांत पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार हरिचंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ नवे दानवाड येथे बौद्ध समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत उपस्थितांनी भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा नेते संजय दादा पाटील म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजातील शेवटच्या घटकाचा विचार केला आहे. अन्न सुरक्षा, प्रधानमंत्री आरोग्य योजना, उज्ज्वला गॅस आणि घरकुल योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात क्रांती घडली आहे. 'लाडकी बहीण' योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत असून, दलित व वंचित समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे."
मतदारसंघाच्या प्रगतीसाठी मृणालीराजे पाटील व हरिचंद्र पाटील यांना संधी देण्याचे आवाहन करत पाटील यांनी विकास कामांची ग्वाही दिली:
यावेळी शेतमजूर संघटनेचे नेते सुरेश सासने, पँथर आर्मीचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले आणि माजी सरपंच प्रकाश परीट यांनी आपली मनोगते व्यक्त करत भाजपाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
या बैठकीला पिंटू माळी, प्रकाश बेरड, समीर विजापुरे, अक्षय कदम, नितीन घावट यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बैठकीला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यामध्ये प्रामुख्याने सौ. लक्ष्मी कांबळे, सौ. लता कांबळे, सौ. शानाबाई कांबळे, रमेजा शेरव, शायरा शेख, अनिता धोंत्रे, कल्लवा कांबळे, विश्रांती कांबळे, सुनिता कांबळे, शिल्पा कांबळे, सविता कांबळे, छुबताई कांबळे, यासिन लाडखान यांच्यासह बौद्ध समाजातील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
