अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कोगनोळी नजीक असलेल्या टोलनाका चुकविण्यासाठी तेथील टोल नाक्याला फाटा देऊन अवजड वाहनातून विविध प्रकारची अवैद्य वाहतूक बोरगाव सर्कल मार्गे होत आहे. कर आणि जादा मालवाहतूक करण्यासाठी या अवजड वाहनांना सोयीचे मार्ग उपलब्ध या बोरगांव सर्कल वरून झाले असून पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या छुप्या वाहतुकीला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सिमेंट ,वाळू ,लोखंड , चिरे ,लाकूड यासह गोव्यातून येणारी दारू तसेच महाराष्ट्र येणारा वाळू व कर्नाटकातून जाणारी महाराष्ट्रातून वाळू असे अनेक अवैधरित्या माल यांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर बोरगाव सर्कल येथून होत आहे. तसेच कोगनोळी जवळील आरटीओ चेक पोस्ट नाका चुकवून बोरगाव मार्गे अनेक अवजड वाहने येत आहेत. कोल्हापूरहून हुपरी मार्गे बोरगाव गावातून पास होत आहेत.
बोरगाव सर्कल कर्नाटक महाराष्ट्र राज्याला जोडणारा प्रमुख सर्कल आहे .या मार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते .जवळच वस्त्र नगरी इचलकरंजी व सांगली मिरज बाजारपेठ असल्याने अवजड वाहनांची संख्या या ठिकाणी अधिकच असते. असे असताना टोल नाका चुकविण्यासाठी अनेक अवजड वाहने अवैद्यरित्या बोरगाव मार्गे जात आहेत. या अवजड वाहतूक वाढल्याने तसेच रस्ते अरुंद असल्याने या ठिकाणी दुसऱ्या वाहनांना वाहन पास करणे जिकीरीचे ठरत आहे. दररोज कित्येक रुपयांचा शासकीय टोल व कर ही बुडत आहे .तर सर्कल वरील सर्वच ठिकाणाचे सर्व रस्ते अवजड वाहतुकीमुळे तुटत आहेत .रस्त्यात मोठे खड्डे पडताना पहावयास मिळत आहे. त्यामुळे अपघाताची संख्याही वाढताना दिसत आहे .त्यामुळे शहरवासीयांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे .या अवैध वाहतुकीला चाप बसावा यासाठी पोलीस खात्या कडून ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे .त्यासाठी सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करून ही अवैद्य वाहतूक रोखावी अशी मागणी नागरिकांसह प्रवासी वर्गातून होत आहे.
बोरगाव सर्कल जवळ विधानसभा निवडणुकीत मात्र या ठिकाणी पोलीस खात्याकडून चेकपोस्ट उभारले जाते .या महिन्याच्या कालावधीत अवैध्य वाहतूक बंद असते. त्यानंतर पुन्हा या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवैध्य वाहतूक होत असते. या ठिकाणी चेक पोस्ट असल्यास अवैध्य वाहतूक रोखणे मदत होते . पोलीस विभाग व अबकारी विभागाकडून या ठिकाणी कायमस्वरूपी चे पोस्ट उभारावे अशी मागणी केली जात आहे .गेल्या अनेक वर्षाची ही मागणी असून वरिष्ठ अधिकारी याकडे जातीने लक्ष देऊन या ठिकाणी कायमस्वरूपी चेकपोस्ट उभारावा व या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी, अशी मागणी वाढत आहे.
